Posted inबातम्या

“कर्ज फेडूनही विजय मल्ल्या अजूनही गुन्हेगार?” हर्ष गोएंका यांचा संतप्त सवाल चर्चेत

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) IPL 2025 विजयानंतर माजी संघमालक विजय मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आले. मल्ल्याने सोशल मीडियावर संघाचे अभिनंदन केल्यानंतर, त्याच्या बँक कर्ज प्रकरणावरुन पुन्हा राजकीय आणि सामाजिक चर्चेला सुरुवात झाली. उद्योगपती हर्ष गोएंका यांनी यावर उघडपणे मत मांडत, “कर्जाची परतफेड झाल्यानंतरही मल्ल्याला लक्ष्य का केलं जातं?” असा स्पष्ट सवाल उपस्थित केला आहे. हर्ष […]

Posted inबातम्या

“चीन १०० वर्षांच्या योजना बनवतो, आपण अजूनही रामायणात!” बियाणींनी भारताला दिला आरसा

बिग बझारचे संस्थापक किशोर बियाणी यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये भारत आणि चीनमधील विकास दृष्टिकोनातील फरकावर प्रकाश टाकत काही ठळक विधानं केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की “चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, पण भारत अजूनही भूतकाळात अडकलेला आहे.” त्यांच्या म्हणण्यानुसार, चीननं आपला भूतकाळ बाजूला ठेवत भविष्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे, तर भारत पारंपरिक मूल्यांशी बांधलेला आहे. चीनची […]

Posted inफायनान्स

रेपो दरात पुन्हा कपात! RBI चं सर्वसामान्यांसाठी ‘मोठं गिफ्ट’ – आता EMI होणार इतकी कमी!

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पुन्हा एकदा सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. पतधोरण समितीच्या (Monetary Policy Committee – MPC) बैठकीत रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्सने कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता रेपो दर ५.५०% वर आला असून, गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे व्याजदर कमी होणार आहेत. परिणामी, EMI मध्ये मोठी घट होण्याची […]

Posted inबातम्या

गणपतीसाठी कोकणात जायचंय? २० जून गाठा, नाहीतर रेल्वे तिकीट विसरा!

मुंबई: गणेशोत्सव हा मुंबईकर आणि कोकणवासीयांसाठी एक सांस्कृतिक उत्सव आहे, जो दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या काळात लाखो चाकरमानी आपल्या मूळ गावी, विशेषतः कोकणात, आपल्या कुटुंबासोबत गणपतीचे स्वागत करण्यासाठी परततात. रेल्वे, एसटी आणि खासगी वाहनांद्वारे हा प्रवास केला जातो, परंतु रेल्वेला नेहमीच सर्वाधिक पसंती मिळते. यंदा गणेशोत्सवासाठी रेल्वे आरक्षण ६० दिवस आधी खुले […]

Posted inबातम्या

“फरार म्हणा, पण चोर नाही!” विजय मल्ल्याचं स्फोटक विधान ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

विजय मल्ल्या, ज्याचं नाव भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांमध्ये घेतलं जातं, तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावेळी तो कोणत्या कोर्टाच्या सुनावणीमुळे नाही तर राज शमानीच्या पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. या पॉडकास्टमध्ये त्यानं अनेक मुद्द्यांवर स्पष्टपणे भूमिका मांडली – विशेषतः किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांची माफी, फरार असल्याचा आरोप, आणि भारत परतण्याच्या अटी. किंगफिशर कर्मचाऱ्यांबद्दल खेद व्यक्त विजय मल्ल्याने […]

Posted inफायनान्स

रेपो दरात मोठी कपात! आता ५० लाखांचं कर्ज घेणाऱ्यांची ईएमआय २ हजार रुपयांनी कमी होणार? वाचा संपूर्ण गणित!

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात ५० बेसिस पॉईंट्स म्हणजेच ०.५० टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेपो दर आता ५.५०% वर आला आहे. सलग तिसऱ्यांदा केलेल्या या दरकपातीमुळे बँकांकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जावरचा व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम […]

Posted inबातम्या

फक्त ८२६ रुपयांच्या EMI मध्ये करा ७ ज्योतिर्लिंगांचे दर्शन – IRCTC चं हे टूर पॅकेज पाहून तुम्हीही लगेच बुकिंग कराल!

देशातील विविध धार्मिक स्थळांना भेट देण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने (IRCTC) एक उत्तम आणि परवडणारं टूर पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजद्वारे तुम्ही भारतातील सात प्रमुख ज्योतिर्लिंगांचे दर्शन केवळ ८२६ रुपयांच्या मासिक EMI मध्ये करू शकता. ‘भारत गौरव स्पेशल ट्रेन’ या नावाने उपलब्ध असलेला हा विशेष प्रवास ३० जून २०२५ पासून सुरू होणार आहे […]