Business Insight | Mukesh Ambani Investment Strategy:
मुकेश अंबानी हे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशियात प्रभावशाली आणि दूरदृष्टी असलेले उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यांची प्रत्येक गुंतवणूक ही काटेकोर नियोजन, बाजाराची समज आणि भविष्याचा अचूक अंदाज यावर आधारित असते. अशाच एका दीर्घकालीन गुंतवणुकीतून त्यांनी सुमारे १७ वर्षांत ५०० कोटींच्या गुंतवणुकीवर तब्बल ९,००० कोटी रुपये कमावल्याचं उदाहरण समोर आलं आहे.
ज्यांनी जिओ दिलं, त्याचं आर्थिक खेळही जबरदस्त!
२०१६ मध्ये ‘जिओ’ या दूरसंचार क्रांतीने भारतात डेटा दरात आमूलाग्र बदल घडवला. अंबानींनी या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत केवळ ग्राहकसंख्याच वाढवली नाही, तर डिजिटल इंडिया मोहिमेला गतीही दिली. कोरोना काळातही त्यांनी विदेशी गुंतवणूकदारांकडून अब्जावधी डॉलर्स उभारून रिलायन्सला कर्जमुक्त केलं.
५०० कोटींचा ऐतिहासिक निर्णय, २,२००% परतावा
अंबानींनी १७ वर्षांपूर्वी एशियन पेंट्स या देशातील आघाडीच्या पेंट कंपनीत अंदाजे ५०० कोटी रुपयांची दीर्घकालीन गुंतवणूक केली होती. कालांतराने, या शेअर्सची किंमत वाढत गेली आणि त्यांचे मूल्य ९,०८० कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ, या गुंतवणुकीतून त्यांना सुमारे २,२०० टक्के परतावा मिळाल्याचं स्पष्ट होतं.
कसा झाला हा व्यवहार?
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने आपल्या उपकंपनी सिद्धांत कमर्शियल्समार्फत एशियन पेंट्समधील उर्वरित ४.९ टक्के हिस्सा विकून या गुंतवणुकीची एक्झिट पूर्ण केली आहे.
-
गेल्या आठवड्यात, RIL ने SBI म्युच्युअल फंडला ३.५ कोटी शेअर्स सरासरी ₹२,२०१ च्या दराने विकले.
-
सोमवारी, उर्वरित ८७ लाख शेअर्स ICICI प्रुडेन्शियल लाईफ म्युच्युअल फंडला ₹२,२०७.६५ प्रति शेअर दराने विकण्यात आले.
-
एकूण व्यवहाराची किंमत ९,००० कोटींहून अधिक ठरली.
एशियन पेंट्समधून एक्झिट का घेतली?
गेल्या दोन वर्षांत एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये ३०% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. ही कामगिरी कंपनीसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक ठरली. अशा परिस्थितीत, अंबानींनी योग्य वेळ साधत आपल्या हिस्सा विक्रीचा निर्णय घेतला. त्यामुळे या गुंतवणुकीवर त्यांना नफा मिळवण्यात यश आलं आणि संभाव्य नुकसान टळलं.